सरकारी अधिकाऱ्यांसाठी फडणवीसांचा मोठा निर्णय! आता करता येणार सत्तरीपर्यंत काम

Devendra Fadnavis big decision for government officials Now they can work till seventy : राज्यातील सरकारी अधिकाऱ्यांसाठी राज्य सरकारने एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कारण आता 58 व्या वर्षी निवृत्त झालेल्या राज्यातील सरकारी अधिकाऱ्यांना वयाच्या सत्तरीपर्यंत काम करता येणार आहे. असा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे. मात्र या निर्णयाला विविध कर्मचारी संघटनांनी विरोध दर्शवला आहे.
नेमका काय आहे निर्णय?
राज्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने पुन्हा सेवेवर घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठी सामान्य प्रशासन विभागाकडून एक जाहिरात काढण्यात येणार आहे. यामध्ये पदांची संख्या कामाचे स्वरूप आणि वेतन हे सर्व गोष्टी नमूद केले जातील. या जाहिरातीसाठी अर्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांची एका वर्षाच्या करारावर नियुक्त केले जाईल. त्यानंतर आवश्यकतेनुसार हा करार वाढवला जाईल.
265 जणांचा जीव गेल्यानंतर DGCA ला आली जाग; बोईंगच्या सर्व विमानांची होणार तपासणी
त्यामुळे आता वयाच्या 65 व्या वर्षापर्यंत निवृत्त अधिकाऱ्यांना कामावर राहता येईल. तसेच शारीरिक व मानसिक क्षमता व्यवस्थित असल्यास वयाच्या सत्तरीपर्यंतही त्यांना सेवेत राहता येईल. त्यामुळे आता अ आणि ब गट संवर्गातील अधिकाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर देखील कंत्राटी पद्धतीने काम करता येईल. मात्र क आणि ड गटातील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर या पद्धतीने काम करता येणार नाही.
मंत्र्यांना हायटेक करण्याचे CM फडणवीसांचे स्वप्न रेंगाळले! आयपॅड खरेदी नाहीच…
त्याचबरोबर एखाद्या प्रकरणांमध्ये संबंधित अधिकाऱ्याची चौकशी सुरू असल्यास त्यांना यावेत घेता येणार नाही. तर वेतनासाठी या अधिकाऱ्यांना त्यांचे मूळनिवृत्ती वेतन, महागाई भत्ता, प्रवास भत्ता, निवासी भत्ता, दूरध्वनी भत्ता असे एकूण 80 हजार 750 रुपयांचे वेतन दिले जाणार आहे.